Site icon My Marathi Status

वाल्याचा झाला वाल्मिकी

रामायण आणि महाभारत हे आपले आद्य पूजनीय, वंदनीय अन् आचरणीय असे ग्रंथ, महर्षी वाल्मिकी हे रामायण ह्या ग्रंथाचे श्रेष्ठ रचनाकार! पण हेच महर्षी वाल्मिकी हे पूर्वाश्रमी कोण होते, माहीत आहे का? एक जंगलात वाटमारी करणारा, लोकांचं धन लुटून घेणारा, प्रतिकार करणाऱ्याला मारणारा असा एक दुष्ट, दुराचारी पापी मनुष्य राहत होता. त्याचं नाव वाल्या.

तो जंगलातून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना मारायचा, त्यांचं धन लुटून घ्यायचा व आपल्या कुटुंबाचं पालनपोषण करायचा. दुसऱ्याचं धन चोरायचं, त्या निरपराध लोकांना जीवे मारायचे अन् पापाचे रांजण भरायचे; असे काम तो करीत असे. एकदा काय झालं-जंगलाच्या वाटेवर वाटमारी करायला उभा असणाऱ्या वाल्याला कुणीच वाटसरू भेटला नाही.

मात्र अचानकपणे त्याच्या कानावर ‘नारायण…. नारायण’ असे नाम अन् पाठोपाठ वीणेचा झंकार ऐकू आला. आपल्या हातातली कु-हाड सरसावून वाल्या पुढे आला. त्याने नारदांची वाट अडवली. तेव्हा नारद त्याला म्हणाले, “वाल्या!अरे, माझी वाट कशासाठी अडवतोस? अरे बाबा, माझ्याकडे कसलीच संपत्ती नाही, धन नाही; इतकंच काय,पण साधं भिक्षान्न पण नाही. जे रामनामाचे धन माझ्याकडे आहे, त्या धनाचा तुला काहीच उपयोग नाही. तू आपली माझी वाट सोड अन् मला माझ्या मार्गाने जाऊ दे.”

तेव्हा वाल्या म्हणाला, “एऽऽ गोसावड्या! तुला काय वाटलं, मी तुझ्या ह्या नाटकाला फसणार आहे? गप्पपणे जे आहे ते मला दे नाहीतर, उगाच माझ्या हातून मरावे लागेल.” तेव्हा नारद म्हणाले, “वाल्या! अरे, अजून अशा किती माणसांना मारणार आहेस तू? वाल्या तुला दिसत नसले तरी तुझ्या डोक्यावरचे अनेक पापांचे पर्वत हे मला दिसत आहेत. उद्या तुलाच ह्या पापाचा हिशेब द्यावा लागणार आहे. तेव्हा तुझ्या ह्या पापात अन्य कुणीही वाटेकरी होणार नाही. तुझं पाप हे पुढे अनेक यातना, कष्ट, ताप, अन् आस ह्या रूपात तुझे तुलाच भोगावा लागणारआहे.

तुझ्या पापाचे अन्य कुणीही वाटेकरी होणार नाही. जा हवं तर घरी जा अन् आपल्या बायको-मुलांना विचारून ये.” “छान! म्हणजे मी तिकडे जातो अन् तू इकडे पसार हो.” वाल्या म्हणाला. “नाही वाल्या,मी कुठेच जाणार नाही. मी इथेच थांबतो.” नारद म्हणाले. तरी वाल्याला मात्र नारद थांबतीलच, असा विश्वास वाटत नव्हता; म्हणून वाल्याने काय केले? त्याने नारदांना एका झाडाला बांधून ठेवले. तो आपल्या बायकोमुलांना ‘तुम्ही माझ्या पापाचे वाटेकरी होणार का?’ म्हणून त्यांना विचारण्यासाठी घरी गेला.

नारदमुनी आपले नामस्मरणात रंगले. वाल्या घरी गेला. आपल्या डोक्यावर पापांच्या राशी उभ्या राहिल्याचे सांगितले. “हे सारे मी तुमच्या पालनपोषणासाठी करतोय. तेव्हा माझ्या पापाचा कोण आणि किती वाटा घ्याल?” असे त्यांना विचारले. पण त्या वेळी “हे पाहा ! आमचे पालनपोषण करणे, हे कुटुंबप्रमुख ह्या नात्याने तुमचे कर्तव्यच होते अन् आहे. आता ती गोष्ट चांगल्या मार्गानं करायची का वाईट मार्गाने, हा तुमचा प्रश्न आहे; तो आमचा नाही.

आम्ही तुमच्या पापाचे वाटेकरी का अन् कशासाठी व्हायचे असे म्हणून बायको-मुलं ह्यांनी त्या पापाचे वाटेकरी होण्यास स्पष्टपणे नकार दिला. मग मात्र वाल्या पुरताच घाबरला. धावत येऊन त्याने “महाराज, क्षमा करा’ असे म्हणत आधी नारदांना मुक्त केले. नंतर तो त्यांचे पाय धरून त्यांना म्हणू लागला, “मुनी,मला या पापातून मुक्त होण्याचा, पापक्षयाचा, पुण्य पदरी पडण्याचा मार्ग दाखवा.”

तेव्हा नारद वाल्याला म्हणाले, “वाल्या,खरंच जर तुला केलेल्या पापाचा पश्चात्ताप झाला असेल,खरोखरच जर तुला पापमुक्त व्हायचं असेल; तर एक कर, तू रामनामाचा जप कर.” लोकांना नेहमी तोंडाने ‘मरा…. मरा’…. म्हणणारा अन् खरोखरच त्यांना मारणारा वाल्या तो! त्याच्या तोंडात ‘राम राम’…. हा शब्द तरी कसा येणार? तरीही आता खरोखरच पापाने भ्यायलेला वाल्या एका दृढ निश्चयाने नारद मुनींना वंदन करून ‘राम राम’ असे न म्हणता ‘मरा मरा’ असे म्हणू लागाला.

त्या मरा मराचेच पुढे राम ह्या सिद्धमंत्रात रूपांतर झाले. अनेक वर्षे वाल्याने तप केले आणि त्या तपाने वाल्याचे पाप जळून गेले. त्याच्या वागणुकीत,वर्तणुकीत, आणि आचारविचार ह्यांत एक उत्तम परिवर्तन झाले. सदाचार, सद्भक्ती अन् सद्वर्तन अन् रामनाम स्मरणाच्या उपासनेने वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. ह्या वाल्मिकी ऋषींनीच पुढे ‘रामायण’ हा आदर्श ग्रंथ लिहिला.

तात्पर्य – पापाचरण करू नये. वाईट वागू नये. पापांच्या अनंत राशी जाळून टाकण्याचे अलौकिक सामर्थ्य हे फक्त ईश्वर-नामातच आहे, हे विसरू नका.

वाल्याचा झाला वाल्मिकी – निबंध

प्रस्तावना:

“वाल्याचा झाला वाल्मिकी” हे एक सुप्रसिद्ध वाक्य आहे जे एका व्यक्तीच्या जीवनातील परिवर्तनाची सुंदर उदाहरणे देणारे आहे. वाल्मिकी हे भारतीय संस्कृतीतील एक महान महर्षी होते, ज्यांनी आपल्या जीवनातील संघर्ष, दुःख आणि अज्ञानातून उचल घेऊन सत्य आणि धर्माच्या मार्गावर पाऊल ठेवले. त्यांनी आपल्या जीवनातील विकृती आणि चुकांना पार करून एक आदर्श निर्माण केला. त्यांची ही प्रेरणादायक कथा केवळ त्याच्या काळातील लोकांसाठीच नाही, तर आजच्या पिढीला देखील मार्गदर्शन करणारी आहे.

वाल्मिकींचा प्रारंभिक जीवन:

वाल्मिकींचा जन्म एक साध्या कुटुंबात झाला होता. प्रारंभिक काळातील त्यांचे जीवन खूपच संघर्षपूर्ण होते. ते एक डाकू होते आणि आपल्या कुटुंबाची पालन पोषण करण्यासाठी त्यांनी अनेक अवैध मार्गांचा अवलंब केला. त्यांचे जीवन अत्यंत पापी आणि अंधकारमय होते. परंतु त्यांच्यात एक लहानशी इच्छा होती की ते आपले जीवन सुधारू इच्छितात.

वाल्मिकींचे जीवनातील परिवर्तन:

एक दिवस वाल्मिकी आपल्या गडबडीतून बाहेर पडण्याचा ठरवला. एक वेळी ते ऋषि नारद यांच्याशी भेटले, आणि त्यांच्याकडून जीवनाचे खरे मूल्य शिकले. नारद मुनींनी त्यांना शिकवले की, “तुमच्या कृत्यांचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल, परंतु त्याच वेळी तुमचं जीवन परिवर्तन होऊ शकते जर तुम्ही योग्य मार्गावर जाल.” यानंतर वाल्मिकींच्या जीवनातील संपूर्ण दृष्टिकोन बदलला.

वाल्मिकी यांनी नंतर योग आणि साधनेचा मार्ग स्वीकारला. त्यांनी मनाची शुद्धता आणि आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी कठोर तपस्येला प्रारंभ केला. अनेक वर्षांच्या साधनेसारख्या कठोर परिश्रमाने त्यांना एक दिव्य अनुभव प्राप्त झाला, आणि त्यांना आत्मज्ञानाची प्राप्ती झाली.

रामायण लेखन:

वाल्मिकी हे भारतातील महान कवी आणि लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांनी “रामायण” या महाकाव्याचे लेखन केले, जे भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचे धार्मिक ग्रंथ आहे. रामायणामध्ये श्रीराम, सीता, लक्ष्मण आणि रावण यांच्या कथेची गोड वर्णन केली आहे. या काव्याचे लेखन करतांना त्यांनी जीवनातील मूल्ये, सत्य, धर्म, कर्तव्य, आणि नैतिकतेचे संदेश दिले. रामायण हा केवळ एक धार्मिक ग्रंथ नाही, तर जीवन जगण्याचे मार्गदर्शन करणारा ग्रंथ आहे.

“वाल्याचा झाला वाल्मिकी” चे प्रतीकात्मक महत्व:

“वाल्याचा झाला वाल्मिकी” हे वाक्य केवळ एक ऐतिहासिक तथ्य नाही, तर एक प्रतीक आहे. हे वाक्य दाखवते की, प्रत्येक व्यक्तीमध्ये परिवर्तन होण्याची क्षमता असते. इथे “वाल्या” म्हणजेच एक विकृत, पापी जीवन जगणारा व्यक्ती, आणि “वाल्मिकी” म्हणजे त्याच व्यक्तीने आपले जीवन बदलले आणि त्याने एक महान महर्षी बनले. हे वाक्य दर्शवते की व्यक्तीचे जीवन परिस्थिती आणि कृत्यांवर आधारित असते, परंतु जर त्या व्यक्तीने इमानदारी आणि श्रद्धेसह योग्य मार्गावर पाऊल टाकले, तर तो महान बनू शकतो.

निष्कर्ष:

वाल्मिकींची जीवनकथा हे एक प्रेरणास्त्रोत आहे. त्यांनी आपल्या जीवनातील वाईट गोष्टींना दुरुस्त करून आपल्या जीवनाचा उद्देश बदलला आणि महान कवी म्हणून आपले नाव घेतले. त्यांचे जीवन सांगते की, “कधीही हार मानू नका, आपल्या जीवनात सुधारणा केली जाऊ शकते.” वाल्मिकींच्या कथेतील संदेश आहे की प्रत्येकाला आपल्या जीवनाच्या मार्गावर चालताना योग्य दिशेचा अवलंब करावा लागतो. जर वाल्मिकी एक पापी डाकू होऊनही महान महर्षी बनू शकला, तर आपल्याला देखील आपले जीवन सुधारण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Exit mobile version