100 Suvichar in Marathi – १०० मराठी सुविचार

हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला 100 Suvichar in Marathi – १०० मराठी सुविचार देणार आहे तर चला बघुयात 100 Suvichar in Marathi. आणखी वाचा – 50+ नवीन छोटे मराठी सुविचार

100 Suvichar in Marathi

१] सुंदर सकाळ पाहण्यासाठी आधी काळोखाची रात्र जावी लागते.
२] मौन हा रागाला जिंकण्याचा सोपा उपाय आहे.
३] जो माणूस चांगली पुस्तके वाचत नाही व ज्याला वाचताच येत नाही, ह्या दोघांत काही फरक नाही.
४] स्वतः तुम्ही उशिरा उठला म्हणून सूर्य उशिरा उगवणार नाही.
५] शब्दात भाव असेल तर शब्दांना भाव मिळेल.
६] अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा.
७] एकदा शिकवणे म्हणजे दोनदा शिकणे.
८] भीती ही नकारात्मक बाबींची अंधारकोठडी असते.
९] स्वत:ला जिंकायचे असेल तर डोक्याचा उपयोग करा, हुतरांना जिंकायचे असेल तर हृदयाचा उपयोग करा.
१०] सज्जन म्हणून जन्माला येणे हा योगायोग, पण सज्जन म्हणून मरणे ही आयुष्यभराची कमाई होय.
११] वेळ निघून गेल्यावर सुचलेला विचार व पिके जळून गेल्यावर पडलेला पाऊस यांची किंमत सारखीच.
१२] शिस्तीशिवाय जीवन म्हणजे सुकाणूशिवाय जहाज.
१३] तुमच्या कार्यावर प्रेम करा, कार्यातील तुमच्यावर नको.
१४] आपल्यामधील एकही दोष लक्षात न येणे, हाच सर्वात मोठा दोष आहे.
१५] घडावे असे वाटते पण घडत नाही, ते घडविण्याचे सामर्थ्य शिक्षणात असते.
१६] चुका करीत नाही, जो काहीच करत नाही
१७] युद्धात निर्धार, औदार्य व शांततेत सदिच्छा हवी
१८] हृदयाने हृदयाला ओळखणे, हाच सर्वश्रेष्ठ धर्म होय.
१९] कोणत्याही गोष्टीपूर्वी तयार होणे हे यशाचे रहस्य आहे.
२०] आत्मसंयम, आत्मजाणीव आणि आत्म-सुधारणा ही तीन गुण ज्याच्यापाशी आहेत त्यानं जग जिंकलं असं समजावं.
२१] विज्ञानात आत्मज्ञान आले तर सर्वोदय होईल.
२२] जगाचा कधी काळी उद्धार झाला तर तो शिक्षकांकडूनच होईल.
२३] अंधश्रद्धेने मूर्ख बनण्यापेक्षा नास्तिक परवडला.
२४] संदेहाने सत्याचे दर्शन होते.
२५] माणसाचे मोठेपण त्याने किती माणसे मोठी केली यावरुन सिद्ध होते.
२६] ज्याची कसलीही मागणी नसते तो सम्राट असतो.
२७] दीर्घकाळ धुमसत राहण्यापेक्षा क्षणभरच का होईना प्रज्वलित होणं.
२८] एखाद्या गोष्टीची गप्प अवस्था म्हणजे तिच्या नाशाची सुरुवात.
२९] अंधाराची चिंता सोडा आणि प्रकाश उजळा.
३०] विनोद हे दोषदर्शनाचे प्रखर व प्रभावी साधन आहे.
३१] सभ्य माणसाचं लक्षण हे की तो दुसऱ्याला दुखवीत नसतो.
३२] सर्वात जास्त आनंद कोणत्या गोष्टीत असेल तर दुसऱ्यांना आनंद देण्यात.
३३] मित्राच्या मृत्यूपेक्षा मैत्रीचा मृत्यू अधिक दुःखदायक असतो.
३४] मानसिक स्वातंत्र्य हेच खरं स्वातंत्र्य आहे.
३५] प्रत्येक व्यक्तीत काही ना काही सामर्थ्य असतेच.
३६] माणसाला सुख हवं असतं पण सुख देणारे पदार्थ नको असतात. दुःख देणारे पदार्थ हवे असतात पण दुःख नको असतं.
३७] वृक्षनाश म्हणजे संस्कृतीचा नाश.
३८] साधु-संत मानवांइतकेच वृक्षाशीही हितगुज करणे श्रेयस्कर समजतात.
३९] विचार केल्याशिवाय लिहिता येत नाही.
४०] बुद्धी आणि भावना यांचा समन्वय साधता येणं ही जीवनकला आहे.
४१] ईश्वराचा आवाज ऐकण्यासाठी प्रत्येकानं मौन पाळलं पाहिजे.
४२] छटाकभर प्रेम शेरभर ज्ञानापेक्षा वरचढ असतं.
४३] जो जिभेच्या अंकित आहे आणि झोपेच्या अधीन आहे तो अध्यात्माचा केव्हाही अधिकारी होऊ शकणार नाही.
४४] आत्मचिंतन करीत राहणं हा महान शिक्षक होण्याचा मार्ग आहे.
४५] अपयश हेच दर्शविते की आणखी साधनेची आवश्यकता आहे.
४६] पशुंना द्रव्याची इच्छा नसते पण तीच इच्छा मनुष्याला पशू बनवते.
४७] आत्मा जिंकला की सर्व काही जिंकले.
४८] मुंगीपाशी जा तिचा उद्योग शिका व शहाणे व्हा.
४९] विश्वासामुळे माणसाला बळ येते.
५०] सद्गुणांसाठी दुसऱ्याकडे बघा व दुर्गुणांसाठी स्वतःवर नजर ठेवा.
५१] विचारांचा दिवा विझला की आचारांचा अंधार होतो.
५२] ज्याच्याजवळ पुस्तक आहे तो एकटा नाही.
५३] मनात ध्येयाची ऊर्मी असेल तर पायात धावण्याची गती येते.
५४] तुम्ही जितके चांगलेपणाने वागाल तितका अधिक चांगुलपणा तुम्हाला प्राप्त होईल.
५५] यशस्वी वाटचालीसाठी प्रथम ‘वाट’ शोधा आणि मग ‘चाल
५६] सवय ही एक तर एकनिष्ठ सेवक बनू शकते किंवा निष्ठूर मालक बनते.
५७] कर्तव्याची प्रीती ही ईश्वराची सर्वश्रेष्ठ भक्ती होय.
५८] व्यवहारात आपण दुसऱ्याची लबाडी ओळखून वागावे, एवढीच लबाडी आपल्यामध्ये असावी.
५९] जहाज पाण्यात चालते पण जहाजात पाणी चालत नाही.
६०] प्राप्तीच्या आनंदापेक्षा प्रयत्नाचा आनंद अधिक आहे.
६१] झाडांची मुळे मिळेल तेथून ओलावा घेण्यासाठी धडपडत असतात. त्याचप्रमाणे ज्ञानोपासकाची दृष्टी हवी.
६२] जर कोणावर उपकार केलात, तर तो स्मरणात ठेवू नका, आणि जर कोणाचा उपकार तुमच्यावर झाला, तर तो विसरू नका.
६३] कर्तृत्वाला कल्पकतेची जोड मिळाली म्हणजे अद्भुत कार्ये घडतात.
६४] कृती हे ज्ञानाचे सुंदर फळ आहे.
६५] हात उगारण्यासाठी नसतात उभारण्यासाठी असतात.
६६] अकारण काळजी करणे म्हणजे न घेतलेल्या कर्जावर व्याज भरण्यासारखे आहे.
६७] सामर्थ्य हेच जीवन; दुर्बलता म्हणजे मृत्यू होय.
६८] मी तुम्हाला एक शस्त्र दिले आहे, ते म्हणजे विवेकशक्ती.
६९] विचारस्वातंत्र्य हा राष्ट्राचा आत्मा आहे.
७०] आपले जीवन हे आपणास मिळालेले एक दान आहे. त्याचे दान करीत राहिल्यानेच त्याचे मोल वाढते.
७१] देशसेवा ही केवळ बुद्धीवर अवलंबून नसून दीर्घोद्योगावर व स्वार्थत्यागावर अवलंबून आहे.
७२] प्रबोधन, संघटन आणि संघर्ष ही परिवर्तनाची वाट आहे.
७३] एका पुरुषाचे शिक्षण हे बहुधा त्याचे एकट्याचेच ठरते पण एका स्त्रीचे शिक्षण म्हणजे भावी पिढीचे शिक्षण असते.
७४] तोडायला वेळ लागत नाही पण जोडायला मात्र लागतो.
७५] ज्याच्याजवळ धैर्यरूपी धन नाही तो खरा निर्धन असतो.
७६] राई एवढा दोष लपविल्याने पर्वताएवढा मोठा होतो.
७७] मोठी माणसे मोठेपणाच्या मागे नसतात.
७८] जे जे आपणास ठावे । ते दुसऱ्यांशी शिकवावे ।
७९] आनंदाचा गुणाकार करावा. दुःखाचा भागाकार करावा.
८०] फुलांचे सौंदर्य बघायला फुलांचे डोळे हवेत.
८१] आई म्हणजे मुलांची पहिला शाळा असते.
८२] सुख व कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.
८३] शिक्षणं म्हणजे सतत विकसित होणं.
८४] जी सुधारणा घडवून आणते, ती खरी टीका.
८५] नराचा वानर किंवा नराचा नारायण करण्याचे सामर्थ्य मनात आहे.
८६] नित्यनेम मोजकेच असावेत पण ते प्राणापलीकडे जपावेत.
८७] ठेच दोन कारणांनी लागते-मुळीच न पाहिल्यामुळे किंवा फार दूरवर पाहिल्यामुळं.
८८] ग्रंथाइतका प्रांजळ व निष्कपटी गुरू नाही.
८९] व्यवहार म्हणजे आपल्या व दुसऱ्यांच्या विचारांची बेरीज-वजाबाकी.
९०] बोलताना विचार करून बोला, बोलून विचारात पडू नका.
९१] जग भित्र्याला भिवविते आणि भिवविणाऱ्याला भिते.
९२] परमेश्वराची अत्युच्च देणगी म्हणजे वेळ , ती वाया घालवू नका.
९३] संस्कृती म्हणजे प्रकृती आणि विकृती यांना दिलेली योग्य आकृती.
९४] उच्चारावरून विद्वत्ता, आवाजावरून नम्रता आणि वर्तनावरून शील समजते.
९५] क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.
९६] शांततेच्या काळात जितका जास्त घाम गाळाल, तितके कमी रक्त युद्धकाळात तुम्हाला सांडावे लागेल.
९७] अपयशाची भीती ही सर्वांत मोठी भीती होय.
९८] मनुष्याचे मन हे पॅरॅशूटसारखे आहे, ते उघडे केले तरच कार्य प्रवण होते.
९९] दया ही अशी भाषा आहे की जी बहिऱ्याला ऐकू येते आणि मुक्यालाही समजू शकते.
१००] माणसाची निम्मी अधिक शक्ती त्याच्या आनंदी वृत्तीतच सामावली आहे.

काय शिकलात?

आज आपण 100 Suvichar in Marathi – १०० मराठी सुविचार पाहिले आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.

खाली दिले आहेत १००+ मराठी सुविचार – हे विचार प्रेरणादायी, सकारात्मक आणि जीवनातील विविध पैलूंवर आधारित आहेत. हे तुम्ही शाळेतील प्रकल्प, भाषण, WhatsApp स्टेटस, Instagram कॅप्शन किंवा दैनंदिन प्रेरणेसाठी वापरू शकता.


🌟 १००+ मराठी सुविचार

🧠 प्रेरणादायी सुविचार

  1. “स्वप्न पाहणं हे सुरुवात आहे, पण त्यासाठी प्रयत्न करणं हे यशाचं गमक आहे.”

  2. “अपयश म्हणजे यशाच्या दिशेने एक पाऊल.”

  3. “धैर्य आणि आत्मविश्वास हे यशाचे दोन महत्वाचे स्तंभ आहेत.”

  4. “प्रत्येक अडचण ही एक नवीन शिकण्याची संधी आहे.”

  5. “स्वप्न पाहा, विश्वास ठेवा, आणि त्यासाठी मेहनत करा.”

  6. “यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं.”

  7. “आयुष्य सहज सोपं जगायला शिका, तरच ते सुंदर होईल.”

  8. “अचूकता पाहिजे तर सराव महत्वाचा.”

  9. “मूर्ख माणूस शांत बसू शकत नाही.”

  10. “चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते.”Pratilipi

💬 जीवनावरील सुविचार

  1. “आयुष्य ही एक कला आहे, जिचे सौंदर्य आपल्या कृतीतून प्रकटते.”

  2. “जीवनातील प्रत्येक अडचण ही आपल्याला अधिक मजबूत बनवण्याची संधी आहे.”

  3. “आयुष्यातील सर्वात मोठी शिक्षा ही आपल्याला आपल्या अपयशांमधून मिळते.”

  4. “आनंदी राहण्याची कला म्हणजे सर्वस्व स्वीकारण्याची क्षमता.”

  5. “स्वप्ने पाहणे ही केवळ सुरुवात आहे, स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम आवश्यक आहे.”

  6. “आयुष्य ही एक सुंदर प्रवास आहे, ज्यामध्ये प्रत्येक दिवस हा नवीन शिकवण आणि अनुभवाची संधी आणतो.”

  7. “आपल्या आयुष्यातील संघर्ष हेच आपल्याला सामर्थ्य आणि साहस प्रदान करतात.”

  8. “प्रत्येक क्षण हा एक नवीन सुरुवात आहे. भूतकाळाच्या चुका आणि अपयशांपासून शिकून, एक नवीन दिवसाचे स्वागत करा.”

  9. “आपल्या आयुष्यातील लोकांचा सन्मान करा. प्रत्येकाच्या अनुभवातून काहीतरी शिकण्याची संधी आहे.”

  10. “सकारात्मकता ही जीवनाची सर्वोत्तम औषधी आहे.”Pratilipi

❤️ प्रेम व मैत्रीचे सुविचार

  1. “मैत्री ही जीवनाची सर्वोत्तम भेट आहे; ती जपा.”

  2. “प्रेम म्हणजे नात्यांची खरी ओळख.”

  3. “खरा मित्र तोच, जो संकटात साथ देतो.”

  4. “प्रेम हे समर्पण आहे, स्वार्थ नाही.”

  5. “मैत्री ही आयुष्याच्या प्रवासातील सर्वात मौल्यवान भेट आहे.”

  6. “प्रेमात विश्वास आणि समजूतदारपणा आवश्यक आहे.”

  7. “मैत्री म्हणजे दोन आत्म्यांचा एकमेकांवरील विश्वास.”

  8. “प्रेम हे दोन हृदयांचं एकत्र येणं आहे.”

  9. “खरी मैत्री वेळेच्या कसोटीवर टिकते.”

  10. “प्रेमात शब्दांची गरज नसते, भावना बोलतात.”Pratilipi

📚 शिक्षण व ज्ञानाचे सुविचार

  1. “ज्ञान हेच खरे संपत्तीचा खजिना आहे.”

  2. “ज्ञान हीच प्रगतीची गुरुकिल्ली आहे.”

  3. “वाचन हे ज्ञानाच्या सागराचे द्वार आहे.”

  4. “प्रश्न विचारणे ही ज्ञानाच्या शोधाची पहिली पायरी आहे.”

  5. “ज्ञानाची खरी परीक्षा त्याचा योग्य वापर करण्यात आहे.”

  6. “शिक्षण हे माणसाचे खरे दागिने आहेत.”

  7. “शिक्षणाशिवाय समाजाचा विकास अशक्य आहे.”

  8. “शिक्षणामुळे माणूस सुसंस्कृत बनतो.”

  9. “शिक्षण हे जीवन घडवणारा अनुभव आहे.”

  10. “शिक्षणामुळे विचार करण्याची क्षमता विकसित होते.


अधिक प्रेरणादायी सुविचारांसाठी, खालील व्हिडिओ पाहा:


तुम्हाला हे सुविचार PDF स्वरूपात, Instagram पोस्टसाठी, WhatsApp स्टेटससाठी किंवा शाळेच्या प्रकल्पासाठी हवे असल्यास, कृपया कळवा – मी ते तुमच्यासाठी तयार करू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: