सुमित्रेची कथा
गौतम ऋषींनी मित्रसह राजाला आणखी एक कथा सांगितली. ते म्हणाले, “गोकर्ण क्षेत्राहून परत येताना आम्हाला मार्गात एक (चांडाळ ) स्त्री पाहायला मिळाली. ती कुष्ठरोगी होती. तिच्या हातापायाची बोटे झडली होती. ती मार्गात कडेला धुळीत लोळत पडली होती. तिचा मृत्यू जवळ आला होता. तोच आम्हाला आकाशातून एक विमान खाली उतरताना दिसले. त्या विमानात चार शिवदूत बसले होते. ते चारही शिवदूत तेजस्वी होते. त्यांचे ते विमान त्या चांडाळ स्त्रीला शिवलोकी नेण्यासाठी आले होते.
ते पाहून आम्ही चकित झालो व त्या शिवदूतांना आम्ही प्रश्न केला, “ही स्त्री इतक्या दुर्धर रोगाने पिडलेली असता तुम्ही हिला शिवलोकी का बरे नेता? तिने कोणते पुण्य केले आहे?” तेव्हा त्यातला एक शिवदूत म्हणाला की, ही चांडाळ स्त्री पूर्वजन्मी एका ब्राह्मणाची मलगी होती. तिचे नाव ‘सुमित्रा’. तिला तिच्या सौंदर्याचा गर्व होता. बालपणी ती विधवा झाली. त्यामुळे ऐन तारुण्यात तिला पुरुषांच्या सहवासाची चटक लागली. वडील तिला खूप बोलले. त्यांनी तिला शिक्षा केली. तरी तिची पुरुषांची चटक कमी होईना. एका पुरुषापासून तिला गर्भ राहिला.
तिच्या वडिलांना हे कळल्यावर त्यांनी तिला घरातून हाकलून दिले. तिच्या सौंदर्यावर मोहित होऊन एका धनवान शूद्राने तिच्याशी विवाह केला. शूद्राच्या घरी सतत मद्यमांस असे. ती भरपूर मांसाहार करी आणि भरपूर मद्य पिऊन झिंगे. एकदा खूप दारू प्यायल्यामुळे तिला खूप भूक लागली. तशीच झोकांडे खात ती उठली. बकरा मारण्यासाठी ती अंधारात मागील दारी गेली आणि तिने एका गाईच्या वासराच्या मानेवरूनच सुरी फिरवली. वासरू मारल्याचे लक्षात आल्यावर तिला वाईट वाटले. पण पोटातील मद्य तिला स्वस्थ बसू देईनात.
तिने वासरू शिजवले. त्याचे मांस खाल्ले आणि माझे वासरू वाघाने मारले म्हणून ती शोक करू लागली. काही काळानंतर सुमित्रा मरण पावली. यमाने तिला नरकात नेले. तिच्या पाप-पुण्याचा हिशेब करून तिला चांडाळ स्त्रीचा जन्म दिला. ती गांवोगाव भीक मागून पोट भरत होती. शिवरात्रीचा दिवस अनेक यात्रेकरू गोकर्ण क्षेत्री चालले होते. तीसुद्धा भीक मागत त्यांच्याबरोबर चालली होती. गोकर्ण क्षेत्री आल्यावर ती भद्रकालीच्या देवळाच्या पायरीशी बसून भीक मागू लागली. पण तिच्या कुष्ठरोगामुळे कोणीही तिच्याजवळ फिरकत नव्हते.
तितक्यात तेथे एक शिवभक्त आला. त्याने तिच्या हातात एक बेलाचे पान ठेवले. तिला वाटले आपल्याला काहीतरी खायला मिळाले. तिने ते तोंडाशी नेले. पण ते बेलाचे पान आहे हे कळताच तिने रागाने दूर भिरकावून दिले. ते वाऱ्याने उडून नेमके शिवशंकराच्या पिंडीवर पडले. शिवरात्रीला तिला उपास घडला. बेलाचे पान शिवाला वाहून तिने पूजन केले. त्यामुळे तिची सर्व पापे नष्ट झाली. म्हणून आम्ही तिला शिवलोकी नेत आहोत. बघता बघता त्या चांडाळ स्त्रीला दिव्य शरीर प्राप्त झाले आणि ती विमानात बसून शिवलोकी गेली.
कथा सांगून झाल्यावर गौतम ऋषी मित्रसह राजाला म्हणाले, “राजा, तू गोकर्ण क्षेत्री जा. शिवरात्रीच्या दिवशी तू शंकर-पार्वतीची बेलाची पाने वाहून पूजा कर. तू ब्रह्महत्येच्या पातकातून व शापातून मुक्त होशील.” राजाने गौतम ऋषींना साष्टांग नमस्कार केला व तो ‘गोकर्ण महाबळेश्वर’ क्षेत्राकडे जाण्यासाठी निघाला.
सुमित्रा ही रामायणातील एक महत्त्वपूर्ण आणि आदर्श स्त्री पात्र आहे. ती अयोध्येच्या राजा दशरथ यांची दुसरी पत्नी आणि लक्ष्मण व शत्रुघ्न यांची माता होती. तीच्या शांत, समंजस आणि निःस्वार्थ स्वभावामुळे ती ‘सुमित्रा’—अर्थात ‘चांगली मैत्रीण’—या नावास योग्य ठरते.Malayalam Wikipedia
👑 सुमित्राचे वंश आणि विवाह
सुमित्रा ही काशी देशाची राजकन्या होती. राजा दशरथ यांच्याशी तिचा विवाह झाला. दशरथाच्या तीन पत्नींपैकी सुमित्रा ही दुसरी राणी होती. दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी केलेल्या यज्ञानंतर मिळालेल्या पायसाचा अर्धा भाग कौसल्येला, त्यानंतरचा अर्धा भाग सुमित्रेला, आणि उरलेला भाग कैकेयीला दिला. नंतर, उरलेला अर्धा भाग पुन्हा सुमित्रेला दिला. या वितरणामुळे सुमित्रेला जुळे पुत्र—लक्ष्मण आणि शत्रुघ्न—प्राप्त झाले. Malayalam Wikipedia
🌿 सुमित्राची भूमिका आणि गुणवैशिष्ट्ये
-
शांत आणि समंजस स्वभाव: सुमित्रा नेहमीच शांत, संयमी आणि समजूतदार राहिली. तिने कौसल्या आणि कैकेयी यांच्याशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवले.
-
मातृत्व आणि त्याग: रामाच्या वनवासाच्या वेळी, सुमित्राने आपल्या पुत्र लक्ष्मणाला रामाच्या सेवेसाठी पाठवले. तिने लक्ष्मणाला सांगितले की, “राम तुझ्यासाठी सर्व काही आहे; त्यांची सेवा करणे हेच तुझे कर्तव्य आहे.”
-
संवेदनशीलता आणि समजूतदारपणा: राम, सीता आणि लक्ष्मण वनवासात गेल्यानंतर, कौसल्या अत्यंत दुःखी होती. त्या वेळी सुमित्राने तिला समजूतदारपणे धीर दिला आणि तिचे सांत्वन केले. A Journal of Indic Ideas – Pragyata
📜 सुमित्राचे महत्त्व
रामायणातील इतर राण्यांच्या तुलनेत सुमित्रा ही नेहमीच शांत, संयमी आणि समजूतदार राहिली. तिच्या निःस्वार्थ प्रेमामुळे आणि त्यागमय वागणुकीमुळे ती एक आदर्श माता आणि पत्नी म्हणून ओळखली जाते.
सुमित्रा ही एक आदर्श स्त्री पात्र आहे, जिने आपल्या कर्तव्यनिष्ठेने, त्यागमय वागणुकीने आणि समजूतदारपणाने संपूर्ण रामायणात आपले स्थान निश्चित केले आहे.
संदर्भ:
-
सुमित्रा – विकिपीडिया
-
Sumitra – Wikipedia
-
The Overlooked Brilliance of Sumitra – Pragyata
-
Sumitra – Wisdom Library