सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी | Surya Nahi Ugavla Tar Nibandh in Marathi
Surya Nahi Ugavla Tar Nibandh in Marathi -: मित्रांनो आज आपण सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत, तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.
सूर्य उगवला नाही तर असा विचार पण आपण करू शकत नाही. कारण सूर्य उगवला नाही तर आपली सगळी कामे होणार नाहीत. माणसाला जगायला जसे हवा, पाणी, निवारा यांची गरज आहे तशीच सूर्याची देखील गरज आहे. सूर्य उगवणे व मावळणे ही नैसार्गिक क्रिया आहे.
ही क्रिया होणार नाही असे होणार नाही. परंतु जर का असे झाले तर मानवाचे जगणे कठीण होईल. ऊन, पाऊस आणि हवा ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. त्यातील कोणतीही गोष्ट नसेल तर संसाराचा ताळमेळ बिघडून जाईल. लहान मुलांना जर सूर्य उगवला नाही तर चालेल का?
Contents
Surya Nahi Ugavla Tar Nibandh in Marathi
हा प्रश्न विचारला तर त्यांना ह्या प्रश्नाची गंमत वाटेल. ते कदाचित असे म्हणतील की चालेल कारण त्यांना असे वाटेल की सूर्य उगवला नाही तर आपल्याला शाळेला सुट्टी मिळेल. पण त्या लहान मुलांना सूर्याचे महत्व माहित नसते. पण ते आपल्याया त्यांना समजवावे लागणार.
सूर्य उगवला नाही तर झाडांना ऊन कोठून भेटणार. झाडांना जगण्यासाठी व मोठे होण्यासाठी जसे पाणी घालावे तसेच त्यांना सुर्याप्रकाश पण आवश्यक आहे. आपल्या पृथ्वीवरील वाढत्या प्रदुषणामुळे मानवाचे जगणे कठीण झाले आहे. झाडांना सूर्यप्रकाश भेटला नाही तर ती झाडे सुकून जातील. झाडेच नसतील तर आपणाला ऑक्झिजन भेटणार नाही. “Surya Nahi Ugavla Tar Nibandh in Marathi”
झाडेच जगली नाहीत तर झाडांपासून मिळणाऱ्या बऱ्याच गोष्टी आपणाला मिळणार नाहीत. दररोज सूर्य उगवतो त्यामुळे सगळे कामाला जातात. हा सूर्य एखादया दिवशी उगवलाच नाही तर? मग उजाडणारच नाही. मनसोक्तपणे गादीवर लोळत पडता येईल. झाडावरच्या पक्ष्यांची झोप संपेल, पण अंधार असल्यामुळे ते उडू शकणार नाहीत.
सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी
रोजच्या सारखा कोंबडा आरवणार नाही, गोठ्यातील गुरेवासरे हंबरणार नाहीत, सगळीकडे अंधारच अंधार राहील. सगळीकडचे चैतन्यच जणू हरवून जाईल. सूर्य उगवला नाही तर… दिवसच नाही. कोणालाही कोणतेही काम करायला उत्साह वाटणार नाही. दुकाने उघडणार नाहीत. बाजार भरणार नाहीत. खरेदीविक्रीचे व्यवहार होणार नाहीत.
सूर्य उगवला नाही तर हळूहळू उष्णता कमी होईल आणि थंडी वाढत जाईल, प्रथम त्या थंडीची मजा वाटेल, पण काही वेळाने मात्र कुडकुडायला होईल. आकाशात तळपणारा सूर्य नसल्यामुळे रस्त्याने जाणाऱ्यांना ऊनही लागणार नाही आणि त्यांचे पायही भाजणार नाहीत.
असे काही फायदे झाले तरी फार काळ सूर्य उगवलाच नाही, तर सारे निसर्गचक्रच कोलमडून पडेल. झाडे, पाने, फुले, फळे फुलणार नाहीत. शेतातील धान्य कसे पिकणार? सूर्य नाही म्हणजे पाण्याची वाफ कशी होणार? मग पाऊस तरी कसा पडणार? Surya Nahi Ugavla Tar Nibandh in Marathi
हे सारे लक्षात आल्यावर सर्वजण हवालदिल झाले. सूर्य केव्हा उगवणार? इतक्यात उजेड आला आणि सगळीकडे आनंदाचा कल्लोळ उठला ‘सूर्य उगवला, सूर्य उगवला!’
Surya Nahi Ugavla Tar Nibandh in Marathi
तर मित्रांनो सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे सूर्य उगवला नाही तर निबंध मराठी मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचली असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ. ‘Surya Nahi Ugavla Tar Nibandh in Marathi’
नक्कीच! खाली “सूर्य नाही उगवला तर” या विषयावर एक विचारप्रवर्तक मराठी निबंध दिला आहे.
☀️ निबंध: सूर्य नाही उगवला तर…
प्रस्तावना:
सूर्य हा पृथ्वीवरील जीवनाचा आधार आहे. तो प्रकाश, ऊब आणि उर्जा देतो. रोज सकाळी त्याचा उगवणारा प्रकाश आपल्या दिवसाची सुरुवात करतो. पण कल्पना करा, जर एखाद्या दिवशी सूर्यच उगवला नाही तर काय होईल?
सूर्य न उगवल्यास परिणाम:
-
अंधारच अंधार:
सूर्य नसेल तर पृथ्वीवर संपूर्ण अंधार पसरेल. झाडे, प्राणी, माणसे – सगळेच गोंधळून जातील. -
थंडीचा कहर:
सूर्याच्या उष्णतेमुळे पृथ्वीवर तापमान संतुलित राहते. सूर्य न उगवल्यास थंडी वाढेल, आणि जीवसृष्टी संकटात येईल. -
अन्नधान्य उत्पादन थांबेल:
झाडांना प्रकाशाची गरज असते. प्रकाशाशिवाय सूर्यप्रकाश संश्लेषण होणार नाही आणि अन्न उत्पादन बंद होईल. -
जीवनच नाही:
सूर्याशिवाय पृथ्वीवर जीवन शक्य नाही. समुद्रातील जीव, पक्षी, प्राणी, माणसे – सगळेच हळूहळू नष्ट होतील. -
घड्याळ थांबेल:
आपला दिवस व रात्र यांचे मोजमाप सूर्याच्या आधारावर होते. सूर्य नसेल, तर कालगणनाही गडबडेल.
निष्कर्ष:
सूर्य हा फक्त आकाशातील तारा नाही, तर तो संपूर्ण जीवनाचा आधार आहे. त्याच्यामुळेच पृथ्वीवर जीवन फुलते, निसर्ग सजतो आणि मानवजात पुढे जाते. म्हणूनच आपण सूर्यदेवतेचे ऋणी आहोत.
एक ओळ:
“सूर्याशिवाय जीवन अशक्य आहे – म्हणूनच तो निसर्गातील देव आहे!”
हवे असल्यास, याच विषयावर चित्रमय प्रोजेक्ट, स्लोगन, कविता किंवा पोस्टर सुद्धा तयार करून देऊ शकतो. सांगू का?