झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी | Zhade Lava Zhade Jagva Nibandh Marathi
Zhade Lava Zhade Jagva Nibandh Marathi – मित्रांनो आज ‘झाडे लावा झाडे जगवा’ या विषयावर निबंध मराठी मध्ये पाहणार आहोत तरी हा निबंध तुम्हाला आवडेल अशी आशा करून आपण निबंधास सुरवात करूया.
वृक्षवल्ली आम्हां सोयरे वनचरे !’ खरेच, निसर्गाचा अविभाज्य घटक असलेली ही झाडे आपले सगेसोयरेच असतात; कारण, झाडांमुळे पाऊस वेळेवर व मुबलक प्रमाणात पडतो.
Contents
- 1 Zhade Lava Zhade Jagva Nibandh Marathi
- 2 झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी
- 3 झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी
- 3.1 झाडांपासून आपणाला काय काय भेटते?
- 3.2 झाडे ही सूर्याच्या कोणत्या प्रकारच्या किरणांना पृथ्वीवर येण्यापासून रोखतात.
- 3.3 1. झाडांचे पर्यावरणीय महत्त्व:
- 3.4 2. प्रदूषणावर नियंत्रण:
- 3.5 3. जलस्रोतांचे संरक्षण:
- 3.6 4. आहार आणि औषधांची पुरवठा:
- 3.7 5. मानवी जीवनातील महत्त्व:
- 3.8 6. झाडांच्या नष्ट होण्याचे परिणाम:
- 3.9 7. झाडे लावण्याचे महत्व:
- 3.10 8. झाडे लावण्याचे उपाय:
- 3.11 निष्कर्ष:
Zhade Lava Zhade Jagva Nibandh Marathi
चांगला पाऊस पडला, की शेतीभाती पिकते. परिणामी, पृथ्वीवरील सर्व सजीवांना अन्न, पाणी उपलब्ध होते. झाडांची मुळे जमिनीची धूप होऊ देत नाहीत. ती माती घट्ट धरून ठेवतात. त्यामुळे, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता (भूजल पातळी) वाढते.
जलचक्र सुरळीत चालते. झुडूप, वेली, रोपटी, वृक्ष इत्यादी झाडांच्या विविध प्रकारांमुळे निसर्गात जैवविविधता जपली जाते. हिरव्यागार झाडांमुळे जणू सृष्टीने हिरवा शालू नेसला आहे असे वाटते. वातावरण प्रफुल्लित होते. “Zhade Lava Zhade Jagva Nibandh Marathi”
झाडाविना ढग गेले
ढगाविना पाणी गेले
पाण्याविना शेती गेली
शतीविना समृद्धी गेली
समृद्धी विना सार हवालदिल झाल
इतके सारे अनर्थ वृक्षतोडीने केले.
झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी
आटपाट नगर होतं. तिथली माणसं होती कष्टाकू. कष्ट फार करायची. खूप धान्य पिकवायची प्रेमानं वागायची. सुखानं नांदायची. नदी होती शेजारी, नगराजवळून वाहणारी. डोह होते पाण्यात मजा वाटे पोहण्यात. पाऊस पंडे वेळेवर, पिकं डुलत शेतांवर.
शेतं होती अलीकडं, जंगल होतं पलीकडे, जंगलात होते हल्ली, करत दंगामस्ती. नदीवर यायचे, डोहामध्ये डुंवायचे. पुढं काय झालं पाऊस मुळी पडेना. प्यायला पाणी मिळेना. शेतं गेली सुकून, लक्ष्मी गेली रूसून. जंगल झालं वैराण, प्राणी झाले हैराण.
ऊन चाललं वाढत. डोह गेले आटत. हल्लीला मिळेना डुंबायला गेला नदीला विचारायला. ‘Zhade Lava Zhade Jagva Nibandh Marathi’
हत्ती नदीला म्हणाला, “गंगामाय, गंगामाय, आता तू वाहत नाहीस. डोहात पाणी साचत नाही. मला डुंबायला मिळत नाही.” नदी म्हणाली, “काय सांगू बाबा तुला ? ढंग इथं थांबत नाहीत. पाऊस मुळी पडत नाही. पाणी मला मिळत नाही. म्हणून मी वाहत नाही. तू ढगालाच जाऊन विचार.” हत्ती गेला ढगाकडे. तो म्हणाला, ढगा, ढगा, रुसलास का ? पाऊस तू पाडत नाहीस.
Zhade Lava Zhade Jagva Nibandh Marathi
नदीला पाणी देत नाहीस. डोहात पाणी साचत नाही. मला डुंबायला मिळत नाही.” ढंग म्हणाला, “आम्ही कुठं नाही म्हणतो ? नेहमीप्रमाणं आम्ही येतो. आम्हांला कुणी अडवत नाही. अडवायला तिथं झाडंच नाहीत, म्हणून आम्ही थांबत नाही. जळणासाठी झाडं तोडली. नवी झाडं नाही लावली.
तू माणसालाच विचार” हत्ती गेला माणसाकडे. तो म्हणाला, “तुम्ही जळणासाठी झाडं तोडली. नवी झाडं का नाही लावली ?” माणूस म्हणाला, “आमच्या हातून चूक झाली. आमची चूक आत्ता कळली. उगाच आम्ही झाडं तोडली. नवी झाडं नाही लावली. म्हणून ढग थांबत नाहीत. पाऊस मुळी पडत नाही. ‘Zhade Lava Zhade Jagva Nibandh Marathi’
आता आम्ही असं करू. जंगल तोडणं बंद करू. सगळीकडं रोपं लावू. घाम गाळून काम करू. रोपांची चांगली निगा राखू. जंगल झाडांनी भरून काढू. झाडांमुळं गारवा नांदेल. गारव्यामुळे पाऊस पडेल. पावसामुळं डोह भरेल. डोहात खूप डुंबायला मिळेल. धरणांमध्ये पाणी भरेल. पाण्यामुळे वीज मिळेल.
झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी
वीज यंत्रं चालवील. उद्योगधंदे वाढबील. जर पृथ्वीवर मानव आनंदात रहावा असे वाटत असेल तर आधी वृक्ष, वेली, जंगले या हिरव्या वैभवाला जगवले पाहिजे, जपले पाहिजे. स्वतःसाठी काहीच ठेवून न घेता वृक्ष आपल्याला हिरवीगार पाने देतात.
त्याच्यापासून पत्रावळी, द्रोण, औषधी याची देणगी लाभते. विविध रंगी, सुगंधी फुले आम्हाला प्रसन्नता देतात. रसाळ फळे आमची भूक भागवतात. अन्न शिजवण्यासाठी जळण, घरातील फर्निचर बनवण्यासाठी लाकूड, उत्तम वाद्ये तयार करण्यासाठी उत्कृष्ट लाकूड झाडांच्या खोडापासून मिळते.
उन्हात ते सावली देतात. प्राणवायू पुरवतात. जमिनीची धूप थांबवतात. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान देणारी जी पुस्तके त्यासाठी कागद तयार होतो, लाकडाच्या लगद्यापासूनच. माणूस मात्र कृतघ्न आहे.
Zhade Lava Zhade Jagva Nibandh Marathi
उपकार करणाऱ्या वृक्षावर हा निर्दय माणूस कुऱ्हाडीचे घाव घालतो. अपकार करणाऱ्यावरही प्रेम करावे हे सांगण्यासाठी संत वृक्षांचेच उदाहरण देतात.
“जो खांडावया घाव घाली। का लावणी जेयाने केली दोघा एकाचि साऊली। वृक्षु दे जैसा” म्हणजे जो अंगाचे तुकडे करण्यासाठी कुन्हाडीचे घाव घालतो आणि जो प्रेमाने रोप लावतो, त्याला आळं करतो, पाणी घालतो आणि काळजी घेतो अशा दोन्ही प्रकारच्या माणसांना वृक्ष आपली सावली देतो तसे भाणसाने वागावे असे ज्ञानदेव सांगतात.
माणूस मात्र उपकार करणाऱ्या वृक्षांना इतके तोडतो की जंगलेच्या जंगले नाहीशी होतात. झाडांची मुळे मातीला धरून ठेवतात. पण अशी झाडे तोडले गेली की पहाडसुद्धा खचायला लागतात.
झाडे लावा झाडे जगवा निबंध मराठी
हवेत शुष्कपणा, कोरडेपणा येतो. पावसाचे प्रमाण उजाड प्रदेशात घटते. पावसाअभावीn त्या भागातली शेते पिकेनाशी होतात. धान्य, भाजी कमी होते म्हणून किंमती चढतात. महागाई वाढते. महागाई वाढली की गरिबांच्या हाल अपेष्टा वाढतात.
तर मित्रांना झाडे लावा झाडे जगवा हा निबंध आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद.
मित्रांनो, तुमच्याकडे Zhade Lava Zhade Jagva मराठी मध्ये काही अजून माहिती तुम्हाला सुचले असतील तर आम्हाला तुमच्या शब्दात आम्हला इमेल द्वारे नक्की पाठवा.
तुमच्या नावासह निबंध नवीन लिहिला जाईल. तो कोठून कॉपी केल्यास आम्ही घेत नाही.
काही अडचण येत असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून विचारू शकता. आम्ही आपल्या प्रश्नांची उत्तर निश्चितपणे देऊ.
झाडांपासून आपणाला काय काय भेटते?
झाडांपासून आपणाला ऑक्सीजन, फळे, फुले, लाकूड आणि सावली अशा उपयुक्त गोष्टी भेटतात
झाडे ही सूर्याच्या कोणत्या प्रकारच्या किरणांना पृथ्वीवर येण्यापासून रोखतात.
झाडे ही सूर्याच्या अल्ट्रावायलेट किरणांना पृथ्वीवर येण्यापासून रोखतात.
झाडे लावा, झाडे जगवा – निबंध
प्राकृतिक पर्यावरणातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडे. झाडे केवळ पर्यावरणाचा एक भाग नाहीत, तर ते पृथ्वीवरील जीवनाचे एक महत्त्वपूर्ण घटक आहेत. झाडे आपल्याला हवा, पाणी, आहार आणि छांव देतात. तसेच, ते पृथ्वीवरील जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. आजच्या या प्रदूषणयुक्त युगात झाडांचे महत्त्व अधिकच वाढले आहे, कारण प्रदूषणामुळे पर्यावरण संकटात आहे. “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश दिला जातो कारण झाडे केवळ पर्यावरणाचे रक्षण करत नाहीत, तर मानवी जीवनासाठीही आवश्यक असतात.
1. झाडांचे पर्यावरणीय महत्त्व:
झाडे पर्यावरणाचा आधारस्तंभ आहेत. ते हवा शुद्ध करतात, पाणी राखतात आणि मातीचे संरक्षण करतात. झाडांची मुळे मातीला धरून ठेवतात, त्यामुळे पाऊस पडताना मातीची धूप होण्यापासून बचाव होतो. झाडे हवेतून कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात आणि ऑक्सिजन सोडतात, ज्यामुळे आपल्याला श्वास घ्यायला सोपे होते. हेच ऑक्सिजन मानवी जीवनासाठी अत्यंत आवश्यक आहे.
2. प्रदूषणावर नियंत्रण:
प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मोठ्या प्रमाणावर गाड्या, कारखाने, आणि इतर उद्योग प्रदूषण वाढवतात. झाडे प्रदूषण कमी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडतात. ते ध्वनी प्रदूषण कमी करतात, वायू प्रदूषण शोषून घेतात आणि हवा शुद्ध करतात. त्यामुळे झाडे लावणे, वाढवणे आणि त्यांचे रक्षण करणे हे अत्यंत आवश्यक आहे.
3. जलस्रोतांचे संरक्षण:
झाडे पाण्याची वाहतूक नियंत्रित करतात. झाडांच्या मुळांमुळे पाणी मातीमध्ये ठराविक प्रमाणात साठवले जाते. तसेच, झाडांची छांव पाण्याच्या वाफेचे प्रमाण कमी करून पाण्याचा शुद्धीकरण करतात. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आणि जलस्रोतांचे संरक्षण करण्यासाठी झाडे अत्यंत महत्त्वाची आहेत.
4. आहार आणि औषधांची पुरवठा:
झाडे आपल्याला फळे, भाज्या, आणि इतर खाद्य पदार्थ प्रदान करतात. फळे, पालेभाज्या, कडधान्ये आणि इतर शाकाहारी पदार्थांचे झाडे महत्त्वपूर्ण स्रोत आहेत. यासोबतच, काही झाडे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतात आणि विविध रोगांवर उपचार करणारे औषधे देखील देतात.
5. मानवी जीवनातील महत्त्व:
झाडांचे सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व देखील आहे. विविध संस्कृतींमध्ये झाडांना आदर दिला जातो. हिंदू धर्मात तर काही झाडांचे विशेष पूजन केले जाते, जसे बिळवेल (बिंब), पिंपळ, वटवृक्ष इ. झाडे शांती आणि सुखाचे प्रतीक मानली जातात.
6. झाडांच्या नष्ट होण्याचे परिणाम:
आजकाल अतिक्रमण, जंगलतोड, औद्योगिकीकरण आणि शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात झाडे नष्ट होत आहेत. यामुळे निसर्गास मोठा धोका निर्माण होतो. यामुळे वायू प्रदूषण, मातीची धूप, पाणी कमी होणे, जलवायु बदल अशा समस्यांचा सामना करावा लागतो. हे सर्व पर्यावरणासाठी हानिकारक ठरते.
7. झाडे लावण्याचे महत्व:
“झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश प्रत्येकाला दिला जातो. झाडे लावून आपण पर्यावरणाचे रक्षण करू शकतो. झाडे लावण्याच्या प्रक्रियेत निसर्गाच्या सृष्टीचे पुनर्निर्माण होते. यामुळे हवामानाचे संतुलन राखले जाते, जलस्रोतांचे रक्षण होते, आणि जैवविविधतेचे संरक्षण होते.
8. झाडे लावण्याचे उपाय:
-
प्रत्येकाने स्वतः झाडे लावली पाहिजेत: घराच्या आवारात, रस्त्यावर, शाळांमध्ये, कार्यालयात आणि सार्वजनिक ठिकाणी झाडे लावणे महत्त्वाचे आहे.
-
निरंतर रक्षण: झाडे लावण्याचे महत्त्व इतकेच, त्यांचे संरक्षण करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. झाडांची योग्य देखभाल आणि पाणी पुरवठा सुनिश्चित करणे आवश्यक आहे.
-
झाडांची निवडक जाती निवडणे: पर्यावरणाच्या अनुकूलतेनुसार आणि हवामानाच्या अनुकूलतेनुसार योग्य झाडांची निवड करणे.
निष्कर्ष:
झाडे हे जीवनाचे स्त्रोत आहेत आणि ते निसर्गाच्या समतोलासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत. आजच्या प्रदूषणमुक्त व हवेच्या शुद्धतेसाठी “झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश प्रत्येकाने हृदयाशी घेतला पाहिजे. आपली जीवनशैली सुधारण्यासाठी आणि पृथ्वीच्या भविष्यासाठी झाडे लावणे आणि त्यांचे संरक्षण करणे हे खूप महत्त्वाचे आहे. “झाडे लावा, झाडे जगवा” हे साधे पण प्रभावी एकत्रित कार्य निसर्गाचे रक्षण आणि मानवी जीवनाची उन्नती करण्यासाठी आवश्यक आहे.