सावित्रीबाई फुले जयंती भाषण | Savitribai Phule Speech in Marathi
हॅलो मित्रांनो आज मी तुम्हाला Savitribai Phule Speech in Marathi (सावित्रीबाई फुले जयंती निमित्त भाषण) सांगणार आहे तर चला बघुयात. आणखी वाचा – सर्व मराठी भाषण
सावित्रीबाई फुले | Savitribai Phule Speech in Marathi
सावित्रीबाई फुले (यांच्या जीवन चरित्रावर ) आज दिनाकं ३ जानेवारी २०२१ दरवर्षी प्रमाणे या वषीं पण आमच्या शाळेत व कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस सर्व विद्यार्थी व विद्यार्थीनींने मिळून मोठ्या उत्साहाने साजरा करतो.
माझ्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मित्रांनो मी आज तुमचा बराच वेळ घेणार नाही. कारण बरेच विद्यार्थी सावित्रीबाईच्या जीवनावर बोलणार आहेत तर मी काही त्यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग सांगत आहे कृपया लक्षपूर्वक ऐकावेत.
आपला भारत देश जेव्हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता. तेव्हा स्त्रियांना मुलींना शिक्षणाची कसलीही सोय उपलब्ध नव्हती.शाळेत मुलींना कुणीही पाठवत नव्हते.
अशा काळात ह्या महान आईनं एका गरीब घरी म्हणजे ३ जानेवरी १८३१ ला जन्म घेतला. त्यांच्या काळात मुलगी म्हणजे उपभोगाची वस्तू समजायचे. चूल आणि मूल हेच तिच्या नशिबी होते.
परंतू महान क्रांतीकारी महात्मा ज्योतीबा फुले यांनी सावित्रीबाई सोबत सन १८४० ला लग्र केले. त्यावेळी सावित्रीबाई अवघ्या ९ वर्षाच्या होत्या. सावित्रीबाईंना काहीच लिहिता वाचता येत नव्हते.
ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिकवलं त्या गणित शिकल्या लिहायला वाचायला शिकल्या. मित्रांनो जेव्हा ज्योतिबा सावित्रीला धडे शिकवत होते त्यावेळी समाजातील अशिक्षित लोक टोमणा मारायचे, त्यांची थट्टा करायचे.
पण त्यांची मनापासून शिक्षण घेण्यासाठी तयारी होती. त्यांनी आपली जिद्द कायम ठेवली व त्या बरेच काही गुण शिकल्या. सुशिक्षित झाल्या. विद्यार्थी मित्रांनो ज्योतिबांच्या मनात स्त्रियांना शिक्षण द्यावे, त्यांना समाजात मानाचे स्थान मिळावे म्हणून त्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला.
पुण्यामध्ये सन १८४८ ला मुलींची पहिली शाळा उघडली. त्या शाळेत पहिली महिला शिक्षक म्हणून सावित्रीबाईंची निवड झाली. मित्रांनो त्या काळी लोक अडाणी, अज्ञानी होते.
जेव्हा सावित्रीबाई शाळेत जाण्यास घरून निघायच्या तेव्हा गावचे लोक त्यांच्या अंगावर शेण-दगड मारून फेकायचे. बरेचदा बाईचे कपडे खराब व्हायचे. परंतू मनात तीव्र जिद्द असताना त्या काही घाबरल्या नाही.
कारण मान-अपमान यांच्याकडे त्यांनी लक्षच दिले नाही. अपमानाच्या दिशेकडे पाठ फिरविली व शिक्षण सुरूच ठेवले. मित्रांनो आज जर कुठल्या व्यक्तीने शिक्षकांवर शेणे, दगड मारलं तर काय होणार? याची जाणीव तुम्हा आम्हांला आहे.
शेतक-यांच्या मुलींना व केले. मुलांना दिवसा वेळ मिळत नव्हता म्हणून सावित्रीबाईंनी रात्रीची शाळा उघडली..१८६४ ला त्यांनी अनाथ बाल आश्रम सुरू त्यांच्या या कार्यक्रमाचे इंग्रजानी सुध्दा स्वागत केले.
एवढे महान कार्य एका स्त्रीने संपूर्ण भारतीय स्त्रियांकरीता केले. त्यांचे ऋण भारतीय स्त्री कधीही फेडू शकणार नाही. आज प्रत्येक मुलीने किंवा बाईने सावित्री बाईचा फोटो लावून दररोज एक अगरबत्ती लावून पूजा केली तरी कमीच आहे.
पुण्यामध्ये २८ नोव्हेंबर १८९० ला प्लेगच्या साथीने जयोतिबा दगावले व सात वर्षांनंतर १० मार्च १८१७ ला भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी शेवटचा श्वास घेतला.’ जे देशासाठी लढले, ते अमर हुतात्मे झाले. सोडीले सर्व संसार, सोडीले सर्व घरदार एवढेच आज बोलून मी माझे दोन शब्द संपवितो.
काय शिकलात?
आज आपण Savitribai Phule Speech in Marathi (सावित्रीबाई फुले जयंती निमित्त भाषण) मराठीत पाहिलं आहे पोस्ट वाचल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
खाली सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारित मराठीतील भाषण दिले आहे. हे भाषण शाळा, महाविद्यालय, समाजिक कार्यक्रम किंवा महिला दिन यांसारख्या विशेष दिवशी उपयोगी आहे.
🌸 सावित्रीबाई फुले यांच्यावरील भाषण (Savitribai Phule Speech in Marathi):
🙏🏻 सर्व उपस्थित मान्यवर, शिक्षकवर्ग, पालक आणि माझ्या प्रिय मित्र-मैत्रिणींनो,
सर्वांना माझा नम्र नमस्कार!
आज मी तुमच्यासमोर एक थोर समाजसुधारक, शिक्षणप्रेमी आणि स्त्रीमुक्तीच्या रणरागिणीवर – सावित्रीबाई फुले यांच्यावर काही शब्द सांगणार आहे आणि मला याचा खूप अभिमान वाटतो.
👩🏻🏫 सावित्रीबाई फुले यांचा जन्म आणि बालपण:
सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी नायगाव (जि. सातारा) येथे झाला. त्या काळात स्त्रियांना शिक्षण घेणे म्हणजे पाप मानले जायचे. पण सावित्रीबाई फुले यांनी या चुकीच्या समाजव्यवस्थेला आव्हान दिलं.
📚 शिक्षण आणि शिक्षिका जीवनाची सुरुवात:
सावित्रीबाईंनी आपल्या पती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रेरणेने शिक्षण घेतलं आणि त्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका झाल्या.
१८४८ मध्ये पुण्यात त्यांनी पहिलं मुलींचं शाळा सुरू केली. हे त्या काळातलं अतिशय धाडसाचं पाऊल होतं.
🚫 सामाजिक संघर्ष:
जेव्हा सावित्रीबाई शाळेत जात असत, तेव्हा लोक त्यांच्यावर दगड, शेण, चिखल फेकत. पण त्या खचल्या नाहीत. त्या एका हातात पुस्तक आणि दुसऱ्या हातात टोपली घेऊन निघायच्या — चिखल फेकला गेला तर स्वतःच साफ करायच्या, पण शिक्षण देणं सोडायचं नाही.
✊ स्त्रीशिक्षण आणि सामाजिक कार्य:
-
त्यांनी स्त्रीशिक्षण, विधवांविवाह, बालहक्क, आणि अस्पृश्यतेविरुद्ध कार्य केलं.
-
सावित्रीबाई फुले यांनी बालहत्येचा विरोध केला आणि गरजू स्त्रियांना आधार दिला.
-
प्लेगच्या काळात त्यांनी रुग्णांची सेवा करत करत स्वतःचा जीव गमावला.
🌟 सावित्रीबाईंचा वारसा:
सावित्रीबाई फुले आजही महिला सक्षमीकरणाचं प्रतीक आहेत. त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे आज आपण सर्वजण शिक्षण घेऊ शकतो. त्यांच्या कार्यामुळेच भारतातील अनेक स्त्रिया आज समाजात आपल्या अधिकारांसाठी उभ्या राहू शकतात.
🎤 समारोप:
सावित्रीबाई फुले म्हणजे क्रांती, शिक्षण, आणि समाजपरिवर्तनाचं मूर्त स्वरूप आहे.
चला, आपण त्यांच्या कार्याचा आदर्श घेवून आपल्या आयुष्यातही शिक्षण, समानता आणि न्याय यासाठी प्रयत्न करूया.
जय सावित्रीबाई! जय भारत!
🙏 धन्यवाद!
तुम्हाला हे भाषण शाळेसाठी संक्षिप्त (१-२ मिनिटे) हवे आहे का?